मित्रांनो, जरा थांबा.. लोकमान्य टिळकांनी गणेश उत्सव सुरु केला तेव्हाची त्याची कारणं आणि आज त्या उत्सवाचं झालेलं इव्हेंट वगैरे वगैरे चावून चोथा झालेला विषय मला चघळायचा नाहीये.
उलट आज सुद्धा गणेशउत्सव साजरा करणं तितकेच आवश्यक आहे असा या लेखनाचा हेतू आहे.
गोंधळलात..?? बरोबर आहे, आता आपण राजकीय पारतंत्र्यात नाही आणि हल्ली लोकांना एकत्र यायला वेळही नसतो, आलेच तर त्यात गोंधळ(आवाजाचा.. विचारांचा नव्हे) होणार हे गृहीत. मग आता गणेश उत्सवाची गरज काय? असा प्रश्न पडून तुम्ही गोंधळु शकता पण तुम्हाला अधिक न गोंधळात पाडता मी माझे स्पष्टीकरण देतो.
मगाशी मी "राजकीय पारतंत्र्य" असा शब्द वापरला हे काही हुशार वाचकांच्या लक्ष्यात आले असेलच. (ज्यांचे चुकून राहून गेले, ते ही हुशारच आहेत बरं का?) पण म्हणजे अजून कुठल्या पारतंत्र्यात आहोत आपण?? वैचारिक पारतंत्र्यात..
आता हे काय बुवा नवीन??
अगदी साधं, रोजच्या जीवनातलं उदाहरण देतो.. अमुक अमुक मेसेज १० लोकांना पाठवा आणि १०जीबी डेटा फुकट मिळवा असे मेसेज हल्लीच तुम्ही फॉरवर्ड केले असतील.. नाहीतर व्हाट्सअप्पवर येणारे PF ऑफिस बद्दलचे मेसेज, एखाद्या अपघाताचा विडिओ वगैरे वगैरे आपण अगदी सहज फॉरवर्ड करतो. पण खरंच तो विडिओ त्याच अपघाताचा आहे की दुसरा जुना, किंवा खरोखरच आपण पाठवतोय तो दुवा (लिंक) त्याच संकेतस्थळाची (वेबसाईट) कि भलतीच? हे तपासण्याचे कष्ट आपण घेतो का? आणि जर नसू करत तर आपण फक्त साक्षर आहोत पण स्वतंत्र विचार करण्याची क्षमता आपण अजून विकसित नाही केली. अर्थात हे फक्त एक उदाहरण झालं. दैनंदिन जीवनात असे अनेक प्रसंग , घटना घडतात जेव्हा आपण "हे असंच असतं" म्हणून डोळे मिटून विश्वास ठेवतो. आणि याचाच फायदा घेऊन आपल्याला लुबाडले जातं किंवा फसवलं जातं.
मला वाटतं या सगळ्या गोष्टींवर विचार करणं, चर्चा होणं आणि फक्त शहरातच नाही तर गावागावांमध्ये हा विषय, ही चर्चा पोहोचली पाहिजे. गणपती उत्सव हे या साठी एक खूप प्रभावी माध्यम ठरू शकतं.
माझं दुसरं कारण थोडं वादग्रस्त असू शकतं पण मला जे वाटतं ते मांडणं मला आवश्यकही वाटतं.
हल्ली आपला कुठला हि सण असला की वेगवेगळे मेसेज फिरू लागतात.. "दिवाळीत पैश्याची नासाडी नका करू. गरीब मुलांना ते जास्त उपयोगी पडतील" "गणपतीत मोठे देखावे, रोषणाई, मिरवणुका यावर खर्च नका करू, ते पैसे दान करा" "होळी मध्ये पाण्याची नासाडी नका करू. पाणी टंचाई आहे."
पण असेच मेसेज मी नाताळ किंवा ईदला पाहत नाही. "५०० रुपयांचा बकरा ५०००० ला खरेदी करू नका, ते पैसे दान करा" " बकरा कापून मग रक्त धुवायला हजारो लिटर पाणी लागतं, एक गाव एक बकरा कापा" "३१ डिसेंबरला DJ मुळे ध्वनी प्रदूषण होतं साजरा नका करू" असे मेसेज कधी पाहिलेत का? नाही नाही.. मी काही कट्टर संघ कार्यकर्ता किंवा शिवसैनिक, मनसैनिक वगैरे नाही पण एकाच विशिष्ट धर्माला जेव्हा लक्ष्य केलं जातं तेव्हा माझ्यासारख्या विचार करणाऱ्या माणसाला नवल वाटायलाच हवे. पण याच उत्तर ब्रिटिशांनी २०० वर्षांपूर्वीच दिले आहे. "एखाद्या समाजाला पराभूत, खच्ची करायचे असेल तर सर्वात आधी त्यांच्या संस्कृतीचं खच्चीकरण करा" अश्या अर्थाचं निवेदन लॉर्ड मेकॉलेने ब्रिटिश संसदेत केलं आणि ब्रिटिशांना भारत आणि इतर बरेच देश पराभूत करणं खूप सोपं गेलं. आजही तोच खेळ आमच्यासोबत खेळला जातोय का?
जर असं होऊ द्यायचं नसेल तर आपण गणेश उत्सवासकट आपले सगळेच सण जोरात साजरे करायला हवेत.. पण थांबा.. याचा असा अर्थ अजिबात नाही की आता करतो तसेच करा. आता आपण काहीतरी चुकतोय हे नक्कीच. आपल्या सणांना आपण इव्हेंट बनवलंय हे चूकच पण सण साजरे न करणं यापेक्षा ते परंपरेप्रमाणे साजरे करणं अधिक आवश्यक आहे. पुन्हा थांबा.. परंपरेप्रमाणे मध्ये पण एक मेख आहे. फक्त अनेक वर्षांपासून चालत आलेली परंपरा असं न म्हणता त्या परंपरांमागचा अर्थ समजून घेऊन, कालसुसंगत पद्धतीने सण साजरे केले जावेत असं माझं ठाम मत आहे.
आणि म्हणूनच १८९२ मध्ये जितकी गणेशउत्सव साजरी करण्याची गरज होती तितकीच आजही आहे.
उलट आज सुद्धा गणेशउत्सव साजरा करणं तितकेच आवश्यक आहे असा या लेखनाचा हेतू आहे.
गोंधळलात..?? बरोबर आहे, आता आपण राजकीय पारतंत्र्यात नाही आणि हल्ली लोकांना एकत्र यायला वेळही नसतो, आलेच तर त्यात गोंधळ(आवाजाचा.. विचारांचा नव्हे) होणार हे गृहीत. मग आता गणेश उत्सवाची गरज काय? असा प्रश्न पडून तुम्ही गोंधळु शकता पण तुम्हाला अधिक न गोंधळात पाडता मी माझे स्पष्टीकरण देतो.
मगाशी मी "राजकीय पारतंत्र्य" असा शब्द वापरला हे काही हुशार वाचकांच्या लक्ष्यात आले असेलच. (ज्यांचे चुकून राहून गेले, ते ही हुशारच आहेत बरं का?) पण म्हणजे अजून कुठल्या पारतंत्र्यात आहोत आपण?? वैचारिक पारतंत्र्यात..
आता हे काय बुवा नवीन??
अगदी साधं, रोजच्या जीवनातलं उदाहरण देतो.. अमुक अमुक मेसेज १० लोकांना पाठवा आणि १०जीबी डेटा फुकट मिळवा असे मेसेज हल्लीच तुम्ही फॉरवर्ड केले असतील.. नाहीतर व्हाट्सअप्पवर येणारे PF ऑफिस बद्दलचे मेसेज, एखाद्या अपघाताचा विडिओ वगैरे वगैरे आपण अगदी सहज फॉरवर्ड करतो. पण खरंच तो विडिओ त्याच अपघाताचा आहे की दुसरा जुना, किंवा खरोखरच आपण पाठवतोय तो दुवा (लिंक) त्याच संकेतस्थळाची (वेबसाईट) कि भलतीच? हे तपासण्याचे कष्ट आपण घेतो का? आणि जर नसू करत तर आपण फक्त साक्षर आहोत पण स्वतंत्र विचार करण्याची क्षमता आपण अजून विकसित नाही केली. अर्थात हे फक्त एक उदाहरण झालं. दैनंदिन जीवनात असे अनेक प्रसंग , घटना घडतात जेव्हा आपण "हे असंच असतं" म्हणून डोळे मिटून विश्वास ठेवतो. आणि याचाच फायदा घेऊन आपल्याला लुबाडले जातं किंवा फसवलं जातं.
मला वाटतं या सगळ्या गोष्टींवर विचार करणं, चर्चा होणं आणि फक्त शहरातच नाही तर गावागावांमध्ये हा विषय, ही चर्चा पोहोचली पाहिजे. गणपती उत्सव हे या साठी एक खूप प्रभावी माध्यम ठरू शकतं.
माझं दुसरं कारण थोडं वादग्रस्त असू शकतं पण मला जे वाटतं ते मांडणं मला आवश्यकही वाटतं.
हल्ली आपला कुठला हि सण असला की वेगवेगळे मेसेज फिरू लागतात.. "दिवाळीत पैश्याची नासाडी नका करू. गरीब मुलांना ते जास्त उपयोगी पडतील" "गणपतीत मोठे देखावे, रोषणाई, मिरवणुका यावर खर्च नका करू, ते पैसे दान करा" "होळी मध्ये पाण्याची नासाडी नका करू. पाणी टंचाई आहे."
पण असेच मेसेज मी नाताळ किंवा ईदला पाहत नाही. "५०० रुपयांचा बकरा ५०००० ला खरेदी करू नका, ते पैसे दान करा" " बकरा कापून मग रक्त धुवायला हजारो लिटर पाणी लागतं, एक गाव एक बकरा कापा" "३१ डिसेंबरला DJ मुळे ध्वनी प्रदूषण होतं साजरा नका करू" असे मेसेज कधी पाहिलेत का? नाही नाही.. मी काही कट्टर संघ कार्यकर्ता किंवा शिवसैनिक, मनसैनिक वगैरे नाही पण एकाच विशिष्ट धर्माला जेव्हा लक्ष्य केलं जातं तेव्हा माझ्यासारख्या विचार करणाऱ्या माणसाला नवल वाटायलाच हवे. पण याच उत्तर ब्रिटिशांनी २०० वर्षांपूर्वीच दिले आहे. "एखाद्या समाजाला पराभूत, खच्ची करायचे असेल तर सर्वात आधी त्यांच्या संस्कृतीचं खच्चीकरण करा" अश्या अर्थाचं निवेदन लॉर्ड मेकॉलेने ब्रिटिश संसदेत केलं आणि ब्रिटिशांना भारत आणि इतर बरेच देश पराभूत करणं खूप सोपं गेलं. आजही तोच खेळ आमच्यासोबत खेळला जातोय का?
जर असं होऊ द्यायचं नसेल तर आपण गणेश उत्सवासकट आपले सगळेच सण जोरात साजरे करायला हवेत.. पण थांबा.. याचा असा अर्थ अजिबात नाही की आता करतो तसेच करा. आता आपण काहीतरी चुकतोय हे नक्कीच. आपल्या सणांना आपण इव्हेंट बनवलंय हे चूकच पण सण साजरे न करणं यापेक्षा ते परंपरेप्रमाणे साजरे करणं अधिक आवश्यक आहे. पुन्हा थांबा.. परंपरेप्रमाणे मध्ये पण एक मेख आहे. फक्त अनेक वर्षांपासून चालत आलेली परंपरा असं न म्हणता त्या परंपरांमागचा अर्थ समजून घेऊन, कालसुसंगत पद्धतीने सण साजरे केले जावेत असं माझं ठाम मत आहे.
आणि म्हणूनच १८९२ मध्ये जितकी गणेशउत्सव साजरी करण्याची गरज होती तितकीच आजही आहे.
धन्यवाद.
आपला नम्र,
चंदन तहसीलदार.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा